रविवारी उशिरापर्यंत सुरू असलेल्या बचावकार्यात वाचवण्यात आलेल्या 38 जणांवर उपचार सुरू आहेत, तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 4 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याजवळील मावळ येथील रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. परदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी सायप्रसहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून घटनेची माहिती घेतली आहे