या अॅपद्वारे लोक बेकायदेशीर पार्किंग, फूटपाथवर वाहन चालवणे, गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे, दुचाकीवरून तीन जण जाणे, फॅन्सी नंबर प्लेट आणि चुकीच्या दिशेने गाडी चालवणे यासारख्या बाबींबद्दल तक्रार करू शकतात असे अधिकाऱ्याने सांगितले. यासोबतच अपघात, वाहन बिघाड, खड्डे, वाहतूक कोंडी, तेल गळती आणि पाणी साचणे यासारख्या समस्यांची तक्रार देखील करता येईल असे त्यांनी सांगितले.