महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहे गावात लोकांना ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी गावातील ग्राम पंचायतने ठराव मंजूर केला आहे. बहे ग्रामसभेचे सदस्य म्हणाले, आमच्या ग्रामसभेने नुकताच एक ठराव संमत केला आहे की, भविष्यात सर्व निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्यावात. जेणे करुन संविधान आणि लोकशाहीला चालना मिळेल.
या पूर्वी डिसेंबरमध्ये सातारा जिल्ह्यातील कराड(दक्षिण) विधानसभा मतदारसंघातील कोळेवाडी गावातील ग्रामसभेने असाच ठराव केला होता.
बहे ग्रामसभेचे सदस्य म्हणाले, आमच्या ग्रामसभेने नुकताच एक ठराव संमत केला आहे की भविष्यात सर्व निवडणुका बॅलेट पेपर मधून घ्यावात. आम्ही इतर गावांना आणि त्यांच्या ग्रामपंचायतींना देखील असे ठराव संमत करण्याचे आवाहन करतो. जेणेकरून संविधान आणि लोकशाहीचे रक्षण होउ शकेल.गावातील लोकांनी हा प्रस्ताव तहसीलदाराकडे सादर केला आहे.