हर्णेतील बोटी जयगड-रत्नागिरी बंदरात!

गुरूवार, 25 ऑगस्ट 2022 (08:23 IST)
1 ऑगस्टला मासेमारीचा मुहूर्त खराब वातावरणामुळे हुकल्यानंतर मोठय़ा आशेने नौका सज्ज केलेल्या मच्छीमारांना जोरदार पावसामुळे मासेमारीला पुन्हा ब्रेक लावावा लागला. यामुळे दापोली तालुक्यातील हर्णै बंदरातील उलाढाल पूर्ण ठप्प असून मासळी उतरवण्यासाठी बोटी जयगड-रत्नागिरी बंदरात जात असल्याने हर्णै येथील लाखोंची उलाढाल थंडावल्याचा थेट परिणाम येथील उद्योगांवर होत आहे.
 
 मासेमारी हंगामाला सुरुवात झाली असून रत्नागिरी-जयगडजवळील समुद्रात म्हाकूळ मिळत असल्याने हर्णैतील नौका दक्षिणेकडे गेल्या आहेत. जयगड-रत्नागिरी येथे या मासळीला दरही जादा मिळतो. या दोन्ही ठिकाणी अधिक सुविधा असल्याने अवांतर खर्चही कमी होत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. यामुळे हर्णै बंदरात रोज 100 ऐवजी जेमतेम 2 ते 3 बोटी मासळी उतरत आहेत. परिणामी या ठिकाणची लाखोंची उलाढाल थंडावल्याचा थेट परिणाम येथील उद्योगांवर होत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती