औरंगजेबाच्या थडग्यावरून सुरू असलेल्या वादानंतर नागपुरात उसळलेल्या हिंसाचारातील पीडितांना दिलासा मिळू लागला आहे. जिल्हा प्रशासनाने शहरातील दंगलग्रस्तांच्या बँक खात्यात मदत निधी हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या इरफान अन्सारीच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
66 वाहनांचे नुकसान झाले.
नागपूरमधील महाल आणि भालदारपुरा भागात झालेल्या हिंसाचारात चारचाकी आणि दुचाकींसह 66 वाहनांचे नुकसान झाले. यामध्ये दुचाकींसाठी 10,000 रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी 50,000रुपयांची मदत देण्यात आली. हिंसाचारातील एकूण 70 पीडितांना सरकारने मदत पुरवली.