Maharashtra Weather: भारतीय हवामान विभागाने (IMD) मंगळवार आणि बुधवारी मुंबई आणि आसपासच्या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहेआयएमडी मुंबईच्या मते, "आज आणि उद्या मुंबई आणि आसपासच्या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे कारण कमाल तापमान 37-38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, जे फेब्रुवारी महिन्यातील सामान्य तापमानापेक्षा सुमारे 5 अंश सेल्सिअस जास्त आहे.
" आयएमडीने वायव्य भारतात किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. अंदाजानुसार, पुढील चार दिवसांत किमान तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे, त्यानंतर दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे.
आज मध्य भारत आणि गुजरातमध्ये कमाल तापमानात कोणताही महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित नाही. तथापि, यानंतर हळूहळू तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याची अपेक्षा आहे. कोकण, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरील काही ठिकाणी 28 फेब्रुवारीपर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, 20 फेब्रुवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनागमध्ये बर्फवृष्टी झाली.