Bollywood News : प्रसिद्ध विनोदी अभिनेता सुनील पाल काल अचानक गायब झाले. ते एका शोसाठी तो मुंबईबाहेर गेले होते, त्यानंतर ते बेपत्ता झाले. कॉमेडियन घरी न परतल्याने आणि त्यांचा फोन न सापडल्याने सुनीलची पत्नी सरिता पाल यांनी मंगळवारी मुंबई पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
मिळालेल्या माहितीनुसार यानंतर पोलिसांनी कारवाई करीत आता पोलिसांनी सुनील पाल यांच्याशी संपर्क साधल्याची बातमी समोर येत आहे. ते आज मुंबईत येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुनील पाल मुंबईत आल्यानंतर पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुनाली पाल अनेकदा आपल्या शोसाठी मुंबईबाहेर जातात. सुनील 3 तारखेला मुंबईला परतणार होते. पण ते आले नाही. अनेक तास फोन करूनही सुनीलच्या पत्नीशी संपर्क होऊ शकला नाही. सुनील पाल यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या पत्नीने पोलिस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली.
सुनील पाल यांनी 2005 साली 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' जिंकून लोकप्रियता मिळवली. यानंतर तो द ग्रेट इंडियन कॉमेडी शो, कॉमेडी चॅम्पियन्स आणि कॉमेडी सर्कस यांसारख्या अनेक शोमध्ये दिसला. सुनील पाल यांनीही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.