महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी प्रचंड विरोधामुळे मराठी भाषा आंदोलन थांबवले आहे. राज्य सरकारच्या कडक भूमिकेमुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला, असे म्हटले जात आहे. पण तरीही राज ठाकरे यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आता मराठी भाषेच्या वादाचे प्रकरण देशाच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांच्या विरोधात एका संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी दाखल केली आहे. राज ठाकरे यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर हल्ले होत आहे आणि बिगर-मराठी समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.