Jalgaon Railway Accident News: जळगाव जिल्ह्यातील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेमुळे घाबरलेल्या प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या. त्याच वेळी, जवळच्या ट्रॅकवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस या दुसऱ्या ट्रेनने काही प्रवाशांना धडक दिली आणि या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील रेल्वे अपघाताची माहिती घेतली. 'एक्स' वरील पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले, "महाराष्ट्रातील जळगाव येथील रेल्वे अपघात अत्यंत दुःखद आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आणि अपघाताची माहिती घेतली. तसेच गृहमंत्री अमित शहा म्हणाले, “स्थानिक प्रशासन जखमींना सर्वतोपरी मदत करत आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो.” उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मृतांवर शोक व्यक्त केला.