अलीकडेच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अर्थखात्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी खात्याच्या मंजूर निधीतून 413 रुपये कोटींच्या निधीला कोणतीही पूर्व सूचना न देता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्याचा आरोप केला.तसेच त्यांनी आरोप केला की, आदिवासी विकास खात्यातून 335 कोटी रुपयांचा निधी देखील अशाच पद्धतीने वळवण्याचा आला.
मुख्यमंत्री फडणवीसांनी या पूर्वी देखील स्पष्ट केलं होतं की, माझी लाडकी बहीण योजना ही वैयक्तिक लाभदायक योजना आहे. बजेट नियमांनुसार तिच्या निधीची नोंद सामाजिक न्याय व आदिवासी विकास खात्यांत करावी लागते. त्यामुळे निधी वळवल्याचा आरोप चुकीचा असल्याचे ते म्हणाले.