मिळालेल्या माहितनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑक्टोबरपर्यंत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. केंद्र, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्र काम केल्यास परिसराचे चित्र बदलेल. पण, गेल्या काही दिवसांपासून निवडणुका न झाल्याने कामगारांमध्ये अस्वस्थता आहे. या निवडणुकांनंतर ही समस्या सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.