22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर निर्णय जाहीर करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. राज्य सरकार या कुटुंबांच्या शिक्षण आणि रोजगाराकडेही लक्ष देईल. या हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला, त्यांच्या मुलीला सरकारी नोकरी दिली जाईल.