Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्र सरकारने सक्तीने धर्मांतरं आणि लव्ह जिहाद प्रकरणां विरुद्ध कायदा आणण्यासाठी राज्य पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीला विरोधकांचा विरोध होत आहे.या कायद्यासाठी स्थापन केलेल्या समिती बद्दल बोलताना भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणाले, लव्ह जिहादवर कायदा झालाच पाहिजे. महाराष्ट्रात तरुणींचे शोषण होत आहे ही फसवणूक थांबवण्यासाठी असा कायदा महाराष्ट्रात येणे आवश्यक आहे. ही गुंडगिरी कुठेतरी थांबावी या साठी अशा कायद्याची नितांत गरज आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
09:19 PM, 15th Feb
महाकुंभमेळ्यावरून परतताना पिकअप ट्रक आणि कंटेनरची धडक चालकाचा मृत्यू
बाळापूर जिल्ह्यातील धुळे येथील चालकासह लोकांना घेऊन जाणाऱ्या पिकअप ट्रकला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यावरून परतताना झाशी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 4 जण गंभीर जखमी झाले. माधव पाटील असे मयत चालकाचे नाव आहे.
महाराष्ट्र सरकारने सक्तीने धर्मांतरं आणि लव्ह जिहाद प्रकरणां विरुद्ध कायदा आणण्यासाठी राज्य पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या समितीला विरोधकांचा विरोध होत आहे.या कायद्यासाठी स्थापन केलेल्या समिती बद्दल बोलताना भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणाले, लव्ह जिहादवर कायदा झालाच पाहिजे. महाराष्ट्रात तरुणींचे शोषण होत आहे ही फसवणूक थांबवण्यासाठी असा कायदा महाराष्ट्रात येणे आवश्यक आहे. ही गुंडगिरी कुठेतरी थांबावी या साठी अशा कायद्याची नितांत गरज आहे. सविस्तर वाचा....
06:56 PM, 15th Feb
98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीत होणार
यंदाचे 98 वे अखिल भारतीय मराठी संमेलन नवी दिल्ली येथे होणार आहे. हे संमेलन मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीसाठी एक ऐतिहासिक क्षण असणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 फेब्रुवारी रोजी 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करतील. हे देशभरातील लेखक आणि समीक्षकांना एकत्र आणेल.
ठाण्यातील पॉश परिसरात सेक्स रॅकेट चालवणाऱ्याला अटक
ठाण्यातील एका रहिवासी भागात एका व्यक्तीला त्याच्या फ्लॅट मध्ये सेक्स रॅकेट चालवण्याबद्द्दल पोलिसांनी अटक केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती एका वृत्तसंस्थेला दिली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीच्या विरुद्द्ध अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या. त्यांनतर ही कारवाई करण्यात आली. सविस्तर वाचा....
05:11 PM, 15th Feb
शिवसेना यूबीटीच्या कोकणातील या नेत्यांची हकालपट्टी, पक्षाने उचलले हे मोठे पाऊल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर माविआला मोठा धक्का बसला आहे. आता शिवसेने ठाकरे गटाने मोठे पाऊल उचलले आहे. पक्षाकडून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष विरोधी कारवाई मध्ये सहभागी होण्याबद्दल त्यांची ह्कालपट्टी करण्यात आली आहे.
नागपूरच्या रुग्णालयात जीबीएसमुळे दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू
सध्या देशभरात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) च्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. देशात सर्वाधिक संसर्ग आणि मृत्यू पुण्यात झाले आहे. महाराष्ट्रात जीबीएसच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून महाराष्ट्रात आता पर्यंत जीबीएसच्या रुग्णांची संख्या 207 वर पोहोचली आहे.सविस्तर वाचा....
03:53 PM, 15th Feb
महाराष्ट्र सरकार ने लव्ह जिहाद कायदा आणण्यासाठी 7 सदस्यांच्या समितीचे स्थापन केले
महाराष्ट्र सरकार आता लव्हजिहाद विरुद्ध कडक कायदा आणायच्या तयारीत आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली 7 सदस्यांच्या समितीचे स्थापन केले आहे. या समिती मध्ये महिला बाल कल्याण विभागाचे सचिव, अल्पसंख्ययक विकास विभागाचे सचिव, कायदा आणि न्याय विभागाचे सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागांचे सचिव आणि गृहविभागांचे उपसचिवांचा समावेश आहे.सविस्तर वाचा....
03:16 PM, 15th Feb
महाराष्ट्र सरकारच्या लव्ह जिहादविरुद्ध कायद्यावर संजय राऊतांनी केली टीका
महाराष्ट्र सरकार लव्ह जिहाद विरोधात कायदा आणत आहे यावर शिवसेना यूबीटी नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. सविस्तर वाचा
गोलगप्पा, पाणीपुरी, पुचका... तुम्ही त्यांना काहीही म्हणा, मसालेदार पाणी आणि चविष्ट पदार्थांनी भरलेले हे कुरकुरीत पदार्थ प्रत्येकाला आवडणारे आहे.पाणीपुरीचे नाव जरी आले तरी तोंडाला पाणी येत. पाणीपुरी सध्या रस्त्यावरील गाळापासून ते पंचतारांकित हॉटेल्स मध्ये उपलब्ध आहे. लग्नसमारंभ मध्ये देखील पाणीपुरी आवर्जून ठेवली जाते. महिला, वृद्ध आबाळ , मुले पाणीपुरी खाण्याचा आस्वाद घेतात. पाणीपुरीच्या दुकानात नेहमीच गर्दी दिसते. सविस्तर वाचा....
12:33 PM, 15th Feb
मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरणात मोठा खुलासा, माजी महाव्यवस्थापकाने १२२ कोटी रुपये पळवले, एफआयआर दाखल
मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरणात पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या माजी महाव्यवस्थापकांवर बँकेच्या तिजोरीतून १२२ कोटी रुपये पळवल्याचा आरोप आहे. सविस्तर वाचा
11:46 AM, 15th Feb
महाराष्ट्र: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरणात मोठा खुलासा, माजी महाव्यवस्थापकांनी तिजोरी लुटली, १२२ कोटी रुपये चोरले
महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. बँकेच्या माजी महाव्यवस्थापकांनी शाखेच्या तिजोरीवर दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या माजी महाव्यवस्थापकांनी बँकेच्या तिजोरीतून १२२ कोटी रुपये काढले आहे. आरोपी माजी महाव्यवस्थापकाचे नाव हितेश प्रवीणचंद मेहता आहे.
11:06 AM, 15th Feb
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कृषीमंत्र्यांचे कक्ष बांधले जातील-कृषी मंत्री माणिकराव कोकाटे
महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अमरावतीला भेट दिली. येथे त्यांनी सायन्स स्कोअर ग्राउंड येथे कृषी विकास परिषद आणि प्रदर्शनाचे उद्घाटन केले. सविस्तर वाचा
10:47 AM, 15th Feb
'लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतर' करण्याविरुद्ध महाराष्ट्र सरकार कठोर कायदा आणणार, समिती स्थापन
महाराष्ट्र सरकार लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्याविरुद्ध कठोर कायदा आणणार आहे. फडणवीस सरकारने महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक (डीजीपी) यांच्या नेतृत्वाखाली ७ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती लव्ह जिहाद आणि सक्तीच्या धर्मांतराशी संबंधित सर्व कायदेशीर आणि तांत्रिक बाबींवर चर्चा करून एक अहवाल तयार करेल आणि हा अहवाल सरकारला सादर करेल.
10:11 AM, 15th Feb
ठाण्यात नैराश्याने ग्रस्त एका व्यक्तीने केली आत्महत्या
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका ५५ वर्षीय बविंदरसिंह गुरुदेवसिंह ठोमर यांनी त्यांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सविस्तर वाचा
10:10 AM, 15th Feb
महाराष्ट्रात जीबीएसच्या रुग्णांची संख्या २०७ वर पोहोचली
महाराष्ट्रात गुलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे दोन नवीन रुग्ण आढळून आले आहे, ज्यामुळे आतापर्यंत संशयित आणि पुष्टी झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २०७ झाली आहे. सविस्तर वाचा
09:38 AM, 15th Feb
महाराष्ट्रात अतिक्रमणासाठी मोफत घर मिळते, राज्य सरकारवर न्यायालयाची कडक टिप्पणी
महाराष्ट्रातील वाढत्या अतिक्रमणाबाबत शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने कडक टिप्पणी केली. न्यायालयाने म्हटले आहे की, महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे जिथे अतिक्रमण करणाऱ्यांना मोफत घरांचा लाभ दिला जातो. सततच्या बेकायदेशीर बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणात घरांची समस्या अधिक गुंतागुंतीची झाली आहे. सविस्तर वाचा
09:37 AM, 15th Feb
कसाबला मुंबईत ज्या तुरुंगात ठेवण्यात आले होते त्याच तुरुंगात तहव्वुर राणा राहील, फडणवीसांनी दिले संकेत
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आम्ही कसाबला ठेवले, त्यात काय मोठी गोष्ट आहे. आम्ही त्याला राणाला नक्कीच ठेवू. तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील तुरुंगांमधील सुरक्षेवर विश्वास व्यक्त केला. सविस्तर वाचा