नागपुरात शिंगाड्याच्या पिठाच्या पुऱ्या खाऊन 25 जणांना विषबाधा

शुक्रवार, 12 एप्रिल 2024 (12:11 IST)
नवरात्रीच्या काळात अनेक उपवास करणाऱ्यांना अन्नातून विषबाधा होत आहे. उपोषण करणाऱ्यांनाही भेसळ करणारे सोडत नाहीत. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये ताजी घटना समोर आली आहे. कोराडी, नागपूर येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिरात काम करणारे 25 हून अधिक कर्मचारी शिंगाडा पिठाची पुरी आणि बटाट्याची भाजी खाल्ल्याने आजारी पडले. त्यामुळे मंदिर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आजारी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, चैत्र नवरात्रीमुळे मंदिरातील अनेक कर्मचारी उपवास करत होते. कर्मचाऱ्यांसाठी फळांसह शिंगाडा पिठाच्या पुऱ्या  बनवण्यात आल्या होत्या. त्याचे सेवन केल्यानंतर कर्मचाऱ्यांना अचानक चक्कर येणे, पोटदुखी, उलट्या होणे आदी तक्रारी सुरू झाल्या. सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे की सर्व रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे सारखीच होती. हे अन्न विषबाधा आहे. प्रत्येकाला प्राथमिक उपचार दिले जात आहेत. रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर आहे
 
कोरडी मंदिर देवस्थान ने गुरुवारी कर्मचाऱ्यांसाठी शिंगाडा आणि राजगिऱ्याच्या पिठाच्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी तयार केली असून या मंदिरातील 25 ते 30 कर्मचाऱ्यांनी त्याचे सेवन केले काहीच तासांनी त्यांना पोटदुखीचा आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 
 
 Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती