हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत मुंबई , रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांमध्ये204 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. या भागात अचानक पूर, भूस्खलन आणि नद्यांच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होण्याचा धोका आहे. शुक्रवारी रात्रीपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे.
शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. माटुंगा, सायन, धारावी, कुर्ला आणि चेंबूर सारख्या भागात रस्ते पाण्याखाली गेले आहेत. उपनगरीय लोकल ट्रेन सेवांवरही परिणाम झाला आहे. महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूर्णपणे सक्रिय केला आहे आणि स्थानिक नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
हवामान खात्याने ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांसाठी पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.