Maharashtra Weather News :राज्यात सध्या पावसाने झोडपले आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई व कोकण विभाग रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या 4 दिवसांत या भागात वादळी वाऱ्यांसह अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ठाणे, कल्याण, डोंबिवली, रायगड आणि पालघर येथे पावसाने दमदार हजेरी लावली आहे.सततच्या पावसामुळे घाटमाथ्यावरील तलाव भरले आहे. धरणांमधून पाणी वाहत आहे. धरण्यातून पाणी सोडल्यामुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे. पुणे परिसरातील घाटमाथा आणि दक्षिण कोकणात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.