मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, बस आणि ट्रकच्या धडकेत 10 ठार, 30 जखमी

Webdunia
मंगळवार, 30 एप्रिल 2024 (15:08 IST)
नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात, बस आणि ट्रकच्या धडकेत 10 ठार, 30 जखमी
महाराष्ट्रातील नाशिक येथे मुंबई-आग्रा महामार्गावर मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. तर 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बस नाशिकहून जळगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकला धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बसला मधूनच कापावे लागले.
 
नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ राहुड घाटात महाराष्ट्र परिवहन एसटी बस आणि ट्रक यांच्यात भीषण धडक झाली. या अपघातात किमान 10 प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघाताचा बळी ठरलेली बस महाराष्ट्रातील जळगावहून वसई-विरारला जात होती.
 
 
प्राथमिक तपासात टायर फुटल्याने अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. टायर फुटल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटले. सकाळी 9.30 च्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला, त्यानंतर काही स्थानिक लोकांनी पीडितांच्या मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली.

संबंधित माहिती

पुढील लेख