मिळालेल्या माहितनुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अडचणी वाढू शकतात. दिल्लीच्या केंद्रीय अर्थमंत्री कोर्टाने त्यांना मानहानीच्या खटल्यात नोटीस पाठवली आहे. आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांच्या पत्नी लिपिका मित्रा यांनी दिल्लीच्या राउज एवेन्यू न्यायालयात अर्थमंत्र्यांविरुद्ध फौजदारी मानहानीचा दावा दाखल केला आहे. लिपिका मित्रा यांनी निर्मला सीतारमण यांच्यावर वैयक्तिक आरोप केल्याचा आरोप केला आहे. तक्रारीत, आप नेत्याच्या पत्नी मित्रा यांनी म्हटले आहे की, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी १७ मे रोजी पत्रकार परिषदेत सोमनाथ भारती यांच्या राजकीय कारकिर्दीला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने त्यांच्या वैवाहिक स्थितीबद्दल खोटे आणि अपमानजनक भाष्य केले.
या प्रकरणात न्यायालयाने नोटीस बजावली
या प्रकरणाची दखल घेत, राउज एवेन्यू कोर्टाचे अतिरिक्त महानगर दंडाधिकारी पारस दलाल यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरुद्ध नोटीस बजावली आहे आणि त्यांचे उत्तर मागितले आहे.