भारतीय महिला क्रिकेट संघ गुरुवारी सिल्हेटमध्ये पाचव्या आणि शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात बांगलादेशचा सामना करेल.आतापर्यंत खेळलेल्या चारपैकी दोन सामन्यांमध्ये पावसामुळे षटकांची संख्या कमी करण्यात आली. भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत फलंदाजांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे
स्मृती आणि हरमनप्रीत यांना संधीचा पुरेपूर फायदा घेऊन गुरुवारी मोठी धावसंख्या करायची आहे. हरमनप्रीतने चौथ्या सामन्यात 26 चेंडूत 39 धावा केल्या होत्या आणि तीच लय कायम ठेवण्याचा ती प्रयत्न करेल.खराब हवामानामुळे हा सामना 14 षटकांचा करण्यात आला आणि भारताने डकवर्थ लुईस पद्धतीचा वापर करून हा सामना 56 धावांनी जिंकला
बांगलादेश संघाला त्याच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे. मात्र, संथ खेळपट्ट्यांवर आतापर्यंत चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांचे कडवे आव्हान त्यांच्यासमोर असेल. भारतासाठी डावखुरा फिरकीपटू राधा यादवने सर्वाधिक सात विकेट घेतल्या आहेत
बांगलादेशने 2023 मध्ये मीरपूर येथे भारताविरुद्धचा शेवटचा टी-20 सामना जिंकला होता