तसेच या दुर्घटनेनंतर महाराष्ट्राचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. बावनकुळे यांनी एक्स वर लिहले की, "नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथे दुपारी वीज पडून एक हृदयद्रावक घटना घडली, जिथे शेतात काम करणाऱ्या एका आई, तिचा मुलगा आणि शेतात काम करणाऱ्या एका शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुःखद घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांप्रती माझे मनापासून संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती!"