राज्यात मास्कमुक्तीच्या चर्चांवर आरोग्य विभागाने दिले 'हे' संकेत

रविवार, 20 फेब्रुवारी 2022 (10:46 IST)
संपूर्ण राज्यामध्ये आता कोरोनाचं संकट कमी होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा मासमुक्तीबाबतच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र मास्क मुक्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मास्कमुक्ती होणार नसल्याचं या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
 
राज्याच्या कोव्हिड विषयक कृतीदल यावर अभ्यास करून त्याबाबत सविस्तर चर्चा केल्यानंतरच याबाबत निर्णय घेईल, असं टास्क फोर्सकडून सांगण्यात आलं आहे.
 
मास्कच्या वापरामुळं प्रदूषण, धूळ आणि धुरक्यामुळं होणाऱ्या श्वसनांच्या आजारापासूनही संरक्षण होतं. त्यामुळं कोरोनानंतरही निरोगी जीवनशैलीसाठी मास्कचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती