जो आमच्या कपाळावर शिक्का बसवलाय तोच अजुन मिटला नाही. तर आणखी नवीन कुठून येईल

Webdunia
शनिवार, 3 डिसेंबर 2022 (20:57 IST)
शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना उद्देशून केलं होतं. यावर शिंदे गटातील आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
 
अब्दुल सत्तार म्हणाले, “२०१९ मध्ये यांनी युती तोडून आणि महाविकास आघाडीसोबत जाऊन जो आमच्या कपाळावर शिक्का बसवलाय तोच अजुन मिटला नाही. तर आणखी नवीन कुठून येईल?, त्यांच्या माथ्यावर जे लिहिलेलं आहे तेच आमच्या माथ्यावर, २०१९ मध्ये महाविकास आघाडी करताना, ज्या युतीमध्ये आम्ही निवडून आलो आणि त्यांना धोका देऊन जे सरकार स्थापन केलं. त्याचा त्यांना कदाचित पश्चाताप होत असेल तर तेच पाहावं, मध्ये काहीदिवस ते राहिले होते(तुरुंगात) तेव्हा त्यांना झाला असं मला वाटतं असं त्यांनी सांगितल. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

पुढील लेख