मिळालेल्या माहितनुसार शुक्रवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत बोलताना शिंदे म्हणाले की, सामान्य माणसाचा विकास हा राज्य सरकारचा प्राधान्यक्रम आहे. प्रमुख निर्देशांमध्ये नाल्यांची स्वच्छता, स्ट्रक्चरल ऑडिट आणि धोकादायक होर्डिंग्ज हटवणे, खड्ड्यांची जलद दुरुस्ती आणि उघडे मॅनहोल सुरक्षित करणे यांचा समावेश आहे. प्रभावी ड्रेनेजसाठी आणि वृक्षांची व्यापक छाटणी अनिवार्य करण्यासाठी रेल्वे आणि महानगरपालिका यांच्यात समन्वय साधण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.