महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी एक्सप्रेसवेवर मंगळवारी रात्री उशिरा धारदार खिळ्यांमुळे किमान ३ गाड्यांचे टायर पंक्चर झाले. मुंबईकडे जाणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गाच्या एका भागात रस्त्यावर खिळे ठोकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला. मोटारचालकांनी पहाटे १ वाजताच्या सुमारास एक्सप्रेसवेवर तीक्ष्ण धातूच्या वस्तू आढळल्याची तक्रार दौलताबाद पोलिस ठाण्यात केली. हा एक्सप्रेसवे मुंबई आणि नागपूरला जोडतो. या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी पोलिसांनी या मार्गाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या रस्त्याच्या कंत्राटदाराला बोलावले आहे.
आमचे पथक घटनास्थळी पोहोचले. रस्त्यावर किती खिळे ठोकले गेले हे आम्हाला अद्याप कळलेले नाही, परंतु तीन गाड्यांचे टायर पंक्चर झाले आहे, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी पोलिसांनी या मार्गाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या रस्त्याच्या कंत्राटदाराला बोलावले आहे.