प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार आता एक मोठे पाऊल उचलणार आहे. भविष्यात राज्यातील सर्व पेट्रोल पंपांवर "नो पीयूसी, नो फ्युएल" मोहीम काटेकोरपणे राबवली जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. म्हणजेच, जर वाहनाकडे पीयूसी नसेल तर त्याला इंधन मिळणार नाही.