मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या उद्घाटनाची वेळ निश्चित केली आहे. गुरुवार, ५ जून रोजी इगतपुरी ते ठाणे हा समृद्धी महामार्गाचा ७६ किमीचा मार्ग वाहनांसाठी खुला केला जाईल. शेवटचा टप्पा सुरू झाल्याने वाहने मुंबई ते नागपूर कमी वेळेत प्रवास करू शकतील. समृद्धीच्या शेवटच्या ७६ किमी मार्गाचे बांधकाम सुमारे महिनाभरापूर्वी पूर्ण झाले आहे. परंतु सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महामार्गाचे उद्घाटन व्हावे अशी इच्छा होती. यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही शेवटचा टप्पा वाहनांसाठी खुला होत नव्हता.