पंढरपूर वारी कधी सुरु झाली? व दिंडी आणि रिंगण' यांचे महत्व जाणून घ्या

बुधवार, 25 जून 2025 (16:46 IST)
पंढरपूर वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. पंढरपूर वारीची परंपरा ८०० वर्षे जुनी आहे. १३ व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथून या यात्रेला सुरुवात केली. दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून दाखल होत असतात. मुसळधार पाऊस, गडगडणारे ढग, चिखलमय रस्ते या भक्तांच्या श्रद्धेला धक्का देऊ शकत नाहीत. विठूमाऊलीचा जयघोष करीत मोठ्या उत्साहाने वारकरी पायावरी करतात. संतांच्या पालखीसोबतच प्रत्येक भक्त ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या नावाच्या जपात मग्न होतात. 
 
१३ व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथून ही पदयात्रा सुरू केली. १७ व्या शतकात संत तुकाराम महाराजांनी देहू ते पंढरपूर अशी पालखी यात्रेची परंपरा सुरू केली. आषाढ शुक्ल एकादशीला अनेक दिंड्या महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गाव, शहर आणि शहरातून पंढरपूरला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात. तसेच पायी चालत जाण्याची हि परंपरा जुनी असल्याचे कारण पूर्वीच्या वाहतूक व्यवस्था नव्हती त्यामुळे लोक वारीला पायीच जात होते आणि तेंव्हा पासून आजहि विठ्ठल भक्त किंवा वारकरी वारीला पायी जाने पसंत करतात. तसेच  संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची दिंडी हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वाखरी गावातील संतनगरी या ठिकाणी एकत्र येतात. या सर्व दिंड्या आषाढ शुध्द दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात, त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आणि आपापल्या दिंड्या हळूहळू पंढरपूरकडे निघतात. तेथे पोहोचल्यानंतर ते चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात. पुंडलिका वरदा हरिविठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरी चा जयघोष संपूर्ण पंढरपूरमध्ये घुमतो. 
 
'दिंडी आणि रिंगण' म्हणजे काय?
दिंडी म्हणजे लहान संघटित गट जे या वारीत शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होतात. प्रत्येक दिंडीसोबत मृदंग, झांज, टाळ, अभंग, हरिपाठ आणि कीर्तन यांचा प्रतिध्वनी वातावरण भक्तिमय बनवतो. तर, 'रिंगण' हा एक पवित्र कार्यक्रम आहे ज्यामध्ये दोन अश्व वाळूच्या शेतात वर्तुळात धावतात, ते परमेश्वराच्या उपस्थितीचे प्रतीक मानले जाते. तसेच रिंगण सोहळ्यात हरीनामाचा जयघोष केला जातो. व वातावरण हरीनामाने दुमदुमून जाते. या सोहळ्यात एक अथवा दोन अश्व सहभागी असतात. यामध्ये एका अश्वावर भगवा पताका घेतलेला स्वार असतो तर एका अश्वावर कोणी नाही बसत कारण रिकाम्या अश्वावर संत बसतात अशी भाविकांची श्रद्धा असते. रिंगण सोहळ्यातील आश्वांच्या पायाखालच्या मातीला इश्वर चरणधुळीचे महत्व असल्याचे भाविक मानतात. तसेच रिंगण हे मोठ्या मैदानात ठेवले जाते. तसेच प्रत्येक पालखी सोहळ्याची रिंगणाची ठिकाणे ठरलेली ही ठरलेली असून रिंगण जेव्हा सुरु होते तेव्हा मध्यभागी पालखी असते व पालखीच्या आजूबाजूला वारकरी व दिंड्या असतात व त्याभोवती रिंगणासाठी मोकळी जागा केली जाते व पुन्हा त्याभोवती दिंड्या असतात. तसेच रिंगण बघायला आलेले वारकरी भक्तमंडळी उभे रहातात. रिंगण बनवणे हे महत्वाचे काम असून  वारकरी भक्तांची शिस्त याठिकाणी पाहावयास मिळते. 
 
वारीचे महत्त्व
वारी ही केवळ धार्मिक तीर्थयात्रा नाही तर सामाजिक सौहार्द, भक्ती, शिस्त आणि सहकार्याचे जिवंत उदाहरण आहे. ही एक महान परंपरा आहे जी जात, वर्ग, वय आणि लिंग पलीकडे जाऊन सर्वांना एकत्र बांधते. लाखो वारकरी ज्यामध्ये  महिला, पुरुष, वृद्ध आणि मुले ही यात्रा एकत्रितपणे पूर्ण करतात.
ALSO READ: Ashadhi Wari 2025 आषाढी वारी केव्हा सुरु होतेय ? दिंडी यात्रा मार्ग, तारीख आणि प्रशासकीय व्यवस्था जाणून घ्या
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती