मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आणि छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कोपर्शी वन संकुलात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची गोपनीय माहिती मिळताच, जिल्हा पोलिस दलाने नक्षलविरोधी कारवाई सुरू केली. बुधवारी सकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रत्युत्तरादाखल ४ नक्षलवाद्यांना ठार केले, ज्यात ३ महिला आणि १ पुरूष नक्षलवादी आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे.
हे यश नक्षलवादी चळवळीसाठी मोठा धक्का आणि पोलिसांसाठी एक मोठी कामगिरी मानली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलोप्तल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ऑपरेशन) एम रमेश यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही चकमक सुरू असल्याची माहिती पोलिस विभागाने दिली आहे.