फोन टॅपिंग अहवाल लीक, सायबर पोलीसामध्ये गुन्हा दाखल

शनिवार, 27 मार्च 2021 (08:19 IST)
फोन टॅपिंग अहवाल लीक केल्या प्रकरणी अज्ञातांविरोधात मुंबईच्या सायबर पोलीसामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टॉप सीक्रेट असलेला अहवाल लीक कसा झाला याबाबत आता चौकशी होणार आहे. रश्मी शुक्ला एसआयडी प्रमुख असताना फोन टॅपिंग झाले होते. फोन टॅपिंगमधून बदल्यांचे रॅकेट असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. महाविकास आघाडी सत्तेत अल्यापासून काही गृहमंत्र्यांसह काही मंत्र्यांचे फोन टॅप होत असल्याची खळबळजनक माहिती मिळाली आहे. या प्रकरणी एक अहवाल लीक झाला असून विरोधकांनी या अहवालावर राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
 
रश्मी शुक्ला (एसआयडी) प्रमुख असताना फोन विनापरवानगी काही मंत्र्यांचे फोन टॅप केले आहेत. या फोन टॅपिंगचा अहवाल रश्मी शुक्ला यांनी लीक केला असल्याचा आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून काही मंत्र्यांचे फोन टॅप केले असल्याचे समजते आहे. याच अहवालाच्या आधारावर परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे आरोप केले आहेत. तसेच विरोधी पक्ष भाजपने या अहवालावरुन राज्य सरकार पोलीसांच्या बदल्यांचे रॅकेट चालवत असल्याचा आरोप केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती