MVA फडणवीस सरकारविरुद्ध विशेषाधिकार प्रस्ताव आणणार

मंगळवार, 4 मार्च 2025 (17:05 IST)
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. मंगळवारी धनंजयमुंडे यांनी राजीनामा दिल्याने विरोधक सरकारवर हल्लाबोल करत आहे. 
ALSO READ: भुजबळ म्हणाले मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मंगळवारी सांगितले की, महाविकास आघाडी महाराष्ट्र सरकार विरुद्ध विषेधाधिकार प्रस्ताव आणणार आहे. महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती विधानसभेला दिली नाही. 
ALSO READ: राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांचे पहिले विधान, सरपंच हत्या प्रकरणावरही केले भाष्य
मंगळवारी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना मुंडे यांच्या राजीनाम्याची माहिती दिली आणि तो स्वीकारल्याचे सांगितले.
ALSO READ: धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वीकारला
जयंत पाटील म्हणाले, हे सभागृहाच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन आहे. अशा महत्त्वाच्या घडामोडींची माहिती आधी सभागृहात द्यायला हवी होती. आम्ही विशेषाधिकार प्रस्ताव आणू. महाविकास आघाडीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी (सपा), काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (युबीटी ) यांचा समावेश आहे.
Edited By - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती