राजकोट किल्ल्यावर पूर्वी स्थापित केलेला महाराजांचा अंदाजे 40 फूट उंच पुतळा 26 ऑगस्ट 2024 रोजी पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पुतळ्याचे अनावरण केले होते. त्यामुळे सरकारला बरीच टीका सहन करावी लागली. विरोधकांनी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर, महायुती सरकारने पुन्हा पुतळ्याच्या जागी हातात तलवार घेऊन महाराजांचा 83 फूट उंच पुतळा बांधला आहे.
या कामासाठी, DUPLEX स्टेनलेस स्टील सपोर्ट फ्रेमवर्क, स्टेनलेस स्टील SS 316 दर्जाचे रॉड यांसारखे गंजरोधक बांधकाम साहित्य वापरले गेले आहे. प्लॅटफॉर्मसाठी उच्च दर्जाचे काँक्रीट आणि स्टेनलेस रॉड वापरण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांत आलेल्या फाययान, निसर्ग, टोकटे सारख्या चक्रीवादळांची तीव्रता लक्षात घेऊन नवीन पुतळा बांधण्यात आला आहे. पुतळा बनवणारे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी दावा केला आहे की पुतळा 100 वर्षे सुरक्षित राहील. पुढील 10 वर्षे नियमित देखभाल आणि देखरेखीची जबाबदारी देखील कंत्राटदारावर आहे.सद्या सतत पडणाऱ्या पावसामुळे जमिनीचा भराव खचल्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज आहे. यामुळे पुतळ्यास कोणताही धोका नसून सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तातडीने दुरुस्ती हाती घेतली आहे