सामाजिक कार्यकर्ते दीपक तभाने म्हणाले की, मोठ्या प्रमाणात प्रदूषित सांडपाणी आणि गटारांचे पाणी जलस्रोतांमध्ये मिसळत असल्याने मासे मोठ्या प्रमाणात मरत आहे. हा एक गंभीर प्रश्न बनला आहे. गोरेवाडा तलावाच्या संवर्धनातील दुर्लक्षाचा मुद्दा गोरेवाडा जंगल ट्रेकर्स ग्रुप आणि सामाजिक संस्थांनी अनेक वेळा उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, दाभा भागातील वाढत्या निवासी क्षेत्रातील सर्व दूषित पाणी २४ तास गोरेवाडा तलावात मिसळत आहे आणि संपूर्ण तलाव दूषित करत आहे. अशा परिस्थितीत, तलावाचे पाणी आता नागरिकांसाठी पिण्यायोग्य राहिलेले नाही.