पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ मे पर्यंत २९ बेकायदेशीर बंगले पाडणार, सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला कोट्यवधींचा दंड

गुरूवार, 15 मे 2025 (08:47 IST)
Pune News: सर्वोच्च न्यायालयाने पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील २९ बेकायदेशीर बंगले पाडण्याचे आदेश दिले आहे. यासोबतच, सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर बंगल्यांच्या मालकांना कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
ALSO READ: Operation Sindoor भाजपच्या तिरंगा यात्रेवर उद्धव ठाकरेंची शिवसेना युबीटी संतापली, म्हणाली- पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला पूर्ण झालेला नाही
मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरातील इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेले २९ बेकायदेशीर बंगले आणि इतर बांधकामे पाडण्यासाठी रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले अपील फेटाळण्यात आले आहे. परिणामी, ग्रीन लॉझने दिलेला निर्णय कायम ठेवत, प्रशासनाला ३१ मे पर्यंत ही बांधकामे पाडून नदीचा प्रत्यक्ष परिसर त्याच्या मूळ स्थितीत आणण्याचे आदेश देण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार इंद्रायणी नदीच्या पूररेषेत असलेल्या या बांधकामांवर कारवाई केली जाईल आणि येथील रहिवाशांना दोन दिवसांची मुदत देण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने सांगितले. चिखली येथील इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेले २९ बेकायदेशीर बंगले आणि इतर बांधकामे पाडण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. न्यायमूर्ती अभय एस. ओका आणि उज्ज्वल भुयान यांनी येथील रहिवाशांचे अपील फेटाळून लावले आहे.
 
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: मुंबईत तिरंगा यात्रा सुरू; फडणवीसांनी घोषणा दिली- ऐक बेटा पाकिस्तान, तुझा बाप हिंदुस्थान

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती