खरं तर संचालक आणि विद्यार्थिनीच्या नात्याची सुरुवात अमोलनेच केली होती. एवढेच नाही.तर अमोलकडे या प्रेमकथेशी संबंधित काही इतर पुरावे देखील होते. प्रेम प्रकरणाची माहिती कोणाला कळू नये म्हणून संचालकानेच विद्यार्थ्यांचे अपहरण केले. त्याने आपल्या काही साथीदारांसह दुचाकीवर केळगावात पाठवले आणि अमोलला घाटात बोलावून आणि अमोलला लाठ्या आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली.
या घटनेननंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने चौघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मारहाणी नंतर त्यांनी अमोलला पुरावे परत करण्याची मागणी केली. अमोलने नकार दिल्यावर त्याला बळजबरी कार मध्ये बसवून त्याचे अपहरण करून सिल्लोडला नेत असताना अमोलच्या ओळखीच्या व्यक्तीने बघितले आणि पोलिसांना माहिती दिली.