आगामी काळात रस्ते विकासाबरोबरच देशांतर्गत जलवाहतूक विकसित करण्याला केंद्र सरकार सर्वोच्च प्राधान्य देणार असून या कामात वाहन क्षेत्रातील कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते, महामार्ग व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी जगभरातील वाहन कंपन्यांना केले. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल व कंपन्यांना आर्थिकदृष्टय़ा किफरयतशीर ठरेल, अशी जलवाहतूक विकसित करण्यासाठी सरकारकडून करसवलतीही देण्यात येईल, असे आश्वासनही गडकरी यांनी यावेळी केले. यासाठी सरकारने 101 नवीन
देशातील रस्ते योग्य पद्धतीने बांधले गेले नसल्याने अनेक रस्त्यांवर अपघाताचे धोके आढळतात तेव्हा रस्तेबांधणी व विकासाच्या कामात भारतीय वाहन कंपन्यांनी पुढे यावे अन्यथा केंद्र सरकारला परदेशी कंपन्यांची मदत घ्यावी लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी वाहन कंपन्यांना दिला.