दुष्काळाचं संकट झेलणाऱ्या महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् कर, असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायाकडे घातलं. आषाढी एकादशीनिमित्त परंपरेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा पार पडली.