नागपूर येथे सुरू असलेले महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळीअधिवेशन संपल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खाते आणि गृहमंत्रालय यांच्या प्रधान सचिवाबरोबर विचारविनिम करून मंत्रालयात प्रवेश देण्याची प्रक्रिया सुलभ आणि किमान त्रास व्हावा, अशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मंत्रालयात नागरिकांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुलभ करा आणि लोकांना प्रवेशासाठी विनाकारण त्रास होऊ नये, याची दक्षता घेण्याला मुख्यमंत्री देवेंद्र ङ्खडणवीस यांनी राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना सूचना दिल्या आहेत.