आयटी क्षेत्राचा महाराष्ट्रातील प्रचंड विस्तार लक्षात घेता या क्षेत्राला कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासाठी एनपीपी तत्वावर संस्था स्थापण्यात येणार असून त्याध्ये केंद्र सरकार (50 टक्के) आणि राज्य सरकारचा (35 टक्के) सहभाग असणार आहे. इतरभागीदारांचा 15 टक्के हिस्सा असणार आहे. राज्य सरकारच्या या या निर्णयाचे आयटी क्षेत्राने स्वागत केले आहे.