शेतात सापडला ट्रक चालकाचा मृतदेह, पाच दिवसांपासून होता बेपत्ता

शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (10:13 IST)
उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमध्ये पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ट्रक चालकाचा मृतदेह जिल्ह्यातील रबुपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील मिर्झापूर गावात एका भातशेतीत सापडला आहे. जास्त मद्यपान केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रबुपुरा पोलिस स्टेशनच्या अधिकारींनी सांगितले की, पोलिसांनी गुरुवारी मिर्झापूर गावात एका भातशेतीतून अनेक दिवस जुना मृतदेह आढळला.  
 
मिळालेल्या माहितीनुसार शेतात म्हशी चरायला गेलेल्या लोकांनी मृतदेह पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली. तसेच तपासादरम्यान पोलिसांना कळले की, मृत व्यक्ती व्यवसायाने ट्रक चालक असून पाच दिवसांपूर्वी त्याचा कुटुंबाशी संपर्क तुटला होता. मृतदेहाजवळ दारूची बाटली सापडल्याचे प्रभारी निरीक्षकांनी सांगितले. चालकाचा मृत्यू जास्त दारू पिल्याने झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.  

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती