एसबीआय चा धक्कादायक अहवाल एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात कोरोनाची दुसरी लाट पीकवर असेल

गुरूवार, 25 मार्च 2021 (18:37 IST)
देशातील सर्वात मोठ्या बँकेSBI ने म्हटले आहे की स्थानिक पातळीवरील लॉकडाउन संसर्ग रोखण्यात कुचकामी असल्याचे दिसून येत आहे आणि साथीच्या रोगाविरूद्ध एकमेव आशा लसीकरण आहे.
फेब्रुवारीपासून देशात कोरोना विषाणूचे संसर्ग वाढत आहे. त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की देशात विषाणू संसर्गाची ही दुसरी लाट आहे ज्याचा सामना देशाला करावा लागत आहे. 
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अहवालात या गोष्टी सांगितल्या आहेत. अहवालानुसार, कोरोनाची दुसरी लाट 100 दिवस देशात सुरू राहू शकते, 
15 फेब्रुवारीपासून बँक संसर्गाची प्रकरणे मोजत आहे. बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे की 23 मार्च पर्यंतच्या परिणामाला बघावे तर देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाटचे प्रकरण  25 लाखांपर्यंत असू शकते.
या अहवालानुसार  "फेब्रुवारीच्या सुरूवातीपासूनच देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरू आहे. दररोजची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. 23 मार्चपर्यंतच्या परिणामांकडे बघितले तर देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची एकूण 25 लाख  प्रकरणे होऊ शकतात. अहवालात म्हटले आहे की एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात दुसरी लहर दिसून येईल. "अहवालात असे म्हटले आहे की स्थानिक पातळीवर लॉकडाऊनचा कोणताही परिणाम दिसून येत नाही आणि कोरोना विषाणूच्या संसर्गाविरुद्ध मोठ्या प्रमाणात लसीकरण या लढाईत एकमेव आशा आहे असे दिसून येत आहे. 
अहवालानुसार महाराष्ट्र आणि पंजाब सारख्या राज्यात ही असे दिसून येत आहे. अहवालात म्हटले आहे की लसीकरणाची गती वाढविणे हा या साथीच्या विरुद्ध लढाईचा एकमेव पर्याय आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 53,476 प्रकरणे झाली आहेत, जी गेल्या 5 महिन्यांत संक्रमणाच्या बाबतीत सर्वात मोठी वाढ आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती