ठाण्यात वीज पडून तीन जणांचा मृत्यू

गुरूवार, 26 सप्टेंबर 2024 (09:38 IST)
महाराष्ट्र पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात मंगळवारी वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुरबाड तालुक्यातील शिरगाव आणि कल्याणजवळ वीज पडण्याच्या घटना घडल्या.  
 
तसेच शिरगाव येथील एका घरावर वीज पडून परशु पवार वय 42 यांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्याने बुधवारी दिली.  
 
त्याचवेळी कल्याण तालुक्यातील कळंबा येथे खाणीत काम करणाऱ्या पुरुष व महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती