याचिकाकर्त्यांचे लग्न 15 एप्रिल 2009 रोजी झाले त्यांना एक मुलगी आहे. 17 ऑक्टोबर 2010 रोजी पत्नी कोणालाही न सांगता तिच्या माहेरी गेली.तिला 24 ऑक्टोबर रोजी आणायला पत्नीच्या माहेरी गेल्यावर त्याचा अपमान करण्यात आला. या व्यतिरिक्त महिलेने सासऱ्यांवर तिच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन केल्याचा खोटा आरोप केला आहे. पत्नी नेहमी आत्महत्या करण्याची धमकी आणि सासरच्यालोकांना तुरुंगात पाठवण्याची धमकी द्यायची.