आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर, एका असहाय्य आईने आपल्या मृत मुलाच्या शुक्राणूसाठी न्यायालयात धाव घेतली आहे. आईने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे जेणेकरून ती तिच्या कुटुंबाला पुढे नेऊ शकेल. महिलेने याचिकेत म्हटले आहे की तिचा पती आणि मुलगा दोघेही मरण पावले आहेत आणि घरात कोणीही पुरूष शिल्लक नाही. अशा परिस्थितीत, तिला तिच्या मुलाच्या वीर्याने कुटुंबाचा वंश पुढे वाढवायचा आहे.
याचिकाकर्त्याच्या मुलाला कर्करोग झाला होता. कर्करोगाशी झुंजताना मुलाचा मृत्यू झाला. त्याने त्याचे शुक्राणू गोठवून शुक्राणू बँकेत ठेवले होते, परंतु मुलाच्या मृत्यूनंतर, प्रजनन केंद्राने त्याच्या आईला वीर्य देण्यास नकार दिला. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निर्णय येईपर्यंत मृत तरुणाचे गोठलेले शुक्राणू सुरक्षित ठेवण्याचे आदेश प्रजनन केंद्राला दिले आहेत.
ही याचिका न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणीसाठी आली. या याचिकेवर न्यायाधीशांनी म्हटले की, जर सुनावणी पूर्ण होण्यापूर्वी तरुणाचे वीर्य खराब झाले किंवा नष्ट झाले तर याचिकेचा उद्देशच अपयशी ठरेल, म्हणून न्यायालयाने प्रजनन केंद्राला याचिकेचा निकाल लागेपर्यंत तरुणाचे वीर्य सुरक्षित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याचिकेत महिलेने म्हटले आहे की जेव्हा तिच्या मुलाला कर्करोगाचे निदान झाले तेव्हा एका ऑन्कोलॉजिस्टने त्याला त्याचे शुक्राणू गोठवण्याचा सल्ला दिला कारण केमोथेरपीमुळे शुक्राणू नष्ट होऊ शकतात. मुलाने त्याच्या कुटुंबाशी सल्लामसलत न करता एका फॉर्मवर सही केली आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याचे शुक्राणू नष्ट करण्याचा निर्णय घेतला.