मुंबईमधील अशोकमील कंपाऊंडमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये, सहा जणांना गंभीररीत्या भाजले

मंगळवार, 28 मे 2024 (11:17 IST)
मुंबई मधील अशोकमीलच्या कंपाऊंडमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये 6 जण गंभीररीत्या भाजले गेले आहे. सांगितले जाते आहे की, आग पहिले कपड्यांच्या मील मध्ये लागली होती. व त्यानंतर ती सर्व दूर पसरली. फायर ब्रीग्रेड च्या पाच पेक्षा जास्त गाड्यांची खूप शर्तीने आगीवर नियंत्रण मिळवले. व जखमी लोकांना रुग्णालयात भरती केले. भीषण गर्मीमुळे आग लागण्याचे प्रमाण वाढत आहे. 
 
देशामध्ये भीषण गर्मी दरम्यान आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहे. मंगळवारी मुंबई मधील धारावी स्लम परिसरात एक कर्मशियल परिसरात आग लागल्याने सहा लोक आगीमुळे भाजले गेले आहे. महानगरपालिकेने या प्रकरणाची चौकशी केली आहे. 
 
अधिकारींनी सांगितले की, जखमी लोकांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. जिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार आगीमध्ये पोळल्या गेलेल्या सहा जणांची प्रकृती आता स्थिर आहे.  
 
एका अधिकारींनी सांगितले की, धारावी परिसरात काला किला मध्ये अशोक मील कंपाऊंडमध्ये तीन आणि चार माजली इमारतीमध्ये पहाटे अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानीय पोलीस, सिविक कर्मचारी, बृहमुंबई इलेक्ट्रिक सप्लाई अँड ट्रान्सपोर्ट चे कर्मचारी अँब्युलन्स घेऊन वेळेवर पोहचले. व आगीच्या विळख्यात सापडलेल्या लोकांना बाहेर काढण्यात यश आले. पण आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालेले नाही. 

Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती