माझं घर वाचवा म्हणत मराठमोळ्या अभिनेता आणि कवी सौमित्र म्हणजे किशोर कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मदतीची विनंती केली आहे.
त्यांनी केलेल्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. फडणवीसांनी किशोर कदम यांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे."किशोरजी आपली तक्रार मी सहकार सचिव प्रवीण दराडे आणि एसआरएचे मुख्या कार्यकारीअधिकारी महेंद्र कल्याणकर यांना कळवली असून त्यांना तातडीने या प्रकरणात लक्ष घालून आपल्याशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.