मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील हा सलग तिसरा रस्ता अपघात आहे. यापूर्वी जैसलमेरमध्ये एका बसला आग लागली होती. गुडामलानीच्या दाबाड गावातील पाच मित्र स्कॉर्पिओमधून प्रवास करत होते. ते सिंधरी येथे आले होते. ते तिथे एका हॉटेलमध्ये जेवण करून रात्री उशिरा परतत होते. त्यावेळी सदा सीमावर्ती भागात एका ट्रेलरने गाडीला धडक दिली. दोन्ही वाहनांची समोरासमोर टक्कर झाली आणि त्यांना आग लागली.
सूत्रांनुसार, पोलिसांनी जळालेल्या चार मित्रांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. एसपी रमेश आणि जिल्हाधिकारी सुशील कुमार यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेह रुग्णालयात दाखल केले आहे. पाचव्या तरुणावर उपचार सुरू आहे. हा अपघात गावापासून ३० किलोमीटर अंतरावर घडला.