Mumbai News : मुंबई किनारपट्टीवर बुधवारी नौदलाची स्पीड बोट एका नौकेला धडकल्याने 13 जणांचा मृत्यू झाला, तर 101 जणांना वाचवण्यात यश आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मदत निधीतूनही भरपाई जाहीर करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील बोट दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहे.