मी तुला घातलेलं कोडं भलतंच अवघड, कसं उलगडू म्हणून विचारमग्न झालेल्या तुला अखेर उमगलं की, आपली धडपड सर्व फोल!
म्हणून तुझाशी अखंड अनुसंधान ठेवून तद्रूप होण्यांनच माझा 'मी' मला गवसणार आहे, 'तू', 'मी'च्या द्वैतापासून 'आम्ही'च्या गन्तव्यापर्यंतचा प्रवास हातात हात घालून केल्यास होणारी आनंद-यात्रा शेवटी आनंदाच्या गावाला नेऊन पोहोचविणार
त्या गावात कुठलेच प्रश्न नाहीत कुठलीच कोडी नाहीत पण अट फक्त एकच हातातला हात मात्र सुटू द्यावयाचा नाही.