आता महाराजांचे शब्द ऐकून, तेनालीराम रसगुल्लाचे मूळ शोधण्याचे आव्हान लगेच स्वीकारतो. तो आचाऱ्याकडे एक वाटी आणि चाकू मागतो, आणि एक दिवसाचा वेळही मागतो. मग दुसऱ्या दिवशी महाराजांच्या दरबारात, तेनाली राम एका वाटीत रसगुल्लाचे मूळ घेऊन येतो. वाटी मलमलच्या कापडाने झाकलेली असते. तेनाली राम तो वाडगा घेऊन शेख व्यापाऱ्याकडे जातो आणि त्याला कापड काढायला सांगतो. शेख व्यापाऱ्याने वाटीचे कापड काढताच तिथे बसलेले सर्वजण आश्चर्यचकित होतात.त्या भांड्यात उसाचे अनेक तुकडे असतात. महाराजांसह सर्वांना आश्चर्य वाटते आणि तेनालीरामला विचारतात की हे काय आहे? हुशार तेनालीराम आपला मुद्दा मांडताना सर्वांना समजावून सांगतात की कोणताही गोड पदार्थ साखरेपासून बनवला जातो आणि साखर ही उसाच्या रसापासून बनवली जाते. म्हणून, रसगुल्लाचे मूळ ऊस आहे. तेनालीरामचे यांचे हे ऐकून सर्वजण हसतात. व राजा पुन्हा तेनालीरामच्या हुशारीवर प्रसन्न होतात.