एकदा एका गावात पूर येतो. लोकं गावातून पळ काढाल लागतात. तेव्हा मंदिराच्या पुजार्यालाही लोकं आपल्यासोबत यायला सांगतात. त्यांचा आग्रह पुजारी नाकारतो. पुजारी म्हणतो, की त्याच्या देवावर पूर्ण विश्वास आहे आणि देव त्याचं नक्कीच रक्षण करेल.
थोड्या वेळाने एका पट्टीचा पोहणारा माणूस पुजार्याला बघून म्हणतो या माझा पाठीवर मी तुम्हाला पलीकडे नेतो. त्यासोबत ही पुजारी जात नाही. शेवटी एक हेलिकॉप्टर येऊन पुजार्याकडे शिडी टाकतो, तेला ही पुजारी नाकारतो.
ते हे संभाषण ऐकून देव हसून म्हणतो, " मी तुझ्यासाठी, एक होडी, एक पोहणारा माणूस आणि हेलिकॉप्टरदेखील पाठवले तरी तू त्या संधीचा फायदा घेतला नाहीस. तू आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या. हे ऐकून पुजार्याला आपली चूक कळली की हे सर्व त्याच्यासाठी साक्षात भगवंताने पाठवले होते आणि त्याने सर्वांना नाकारले.